एखादी
कादंबरी
नाटकाच्या
चौकटीत बसवणे
हे सोपे
काम नाही.
उत्तम
लेखक असलेल्या चिन्मय मांडलेकरांनी
मात्र ते काम प्रभावीपणे
केले
आहे.
जोडीदाराच्या
वागण्यामुळे निर्माण झालेली
नायकाच्या मनातील
अस्वस्थता,
संशयाची
मनात घोंगावणारी भुतं,
नाियकेच्या
मनातील भावनांची
वादळं
यांना
व्यक्त करण्यासाठी कादंबरीकाराला
सविस्तर वर्णनाचा कॅनव्हाॅस
िमळू शकतो.
नाटकात
ते तितक्याच परिणामकारकपणे
आणण्यासाठी पात्रांचे संवाद
आणि स्वगत याला पर्याय नसतो.
मांडलेकरांनी
त्यासाठी नाटकाच्या रचनेत
आणि दिग्दर्शनात शोधलेल्या
जागा चपखल आहेत.
समुद्राच्या
काजेचा पार्श्वसंगितासाठी
केलेला प्रभावी उपयोग,
मोजकेच
पण वातावरण निर्मिती करू
शकणारे नेपथ्य,
समुद्राच्या
काठची रेती दाखवण्यासाठी
रंगमंचावर टाकलेले कापड आणि
त्याचाच डोंगर बनवण्यासाठी
केलेला कल्पक वापर ही दिग्दर्शनाची
अंगेही एकूण परिणामकारकतेत
मोठीच भर घालतात.
नायकाच्या
मनात पत्नीच्या चारित्र्याविषयी
असलेली शंका खरी ठरणे आणि
त्यातही नाियकेकडूनच तिच्या
विवाहबाह्य संबंधांची कबुली
िदली जाणे ही एकमेव घटना या
नाटकाच्या केंद्रस्थानी आहे.
या
एका घटनेशिवाय या नाटकात दुसरे
काहीही घडत नाही.
शिवाय
नाियका ही कबुली नाटकाच्या
पहिल्या अंकातच देऊन टाकते.
त्यामुळे
आता नायक काय करणार,
हा
एकमेव प्रश्न उत्तरार्धात
प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी
वापरला गेला आहे.
पण
हे कथानक आणि औत्सुक्याचा हा
प्रश्नही काही नवा नाही.
तरीही
नाटक प्रेक्षकांना खिळवून
ठेवते ते केवळ आणि केवळ नाियकेच्या
युक्तीवादामुळे.
या
युक्तीवादाचे श्रेय मिलींद
बोकील यांना द्यायचे की चिन्मय
मांडलेकरांना हे कादंबरी
वाचलेल्या आणि नाटकही पाहिलेल्या
वाचक प्रेक्षकांनीच ठरवायला
हवे.
नाियकेचे
विवाहबाह्य संबंध या नाटकाच्या
केंद्रस्थानी असले तरी हे
नाटक म्हणजे त्या संबंधांची
कथा नाही.
त्यामुळे
अशा संबंधांच्या अनुशंगाने
होणारी नाटकाची चर्चा हा या
कलाकृतीवरचा अन्याय ठरू शकतो.
नाटकात
विवाहबाह्य संबंधांचे तुष्टीकरण
केले आहे असे अनेकांना वाटण्याची
शक्यता आहेच;
पण
त्याही पेक्षा उच्च मध्यमवर्गातील
बुद्धीजीवी महिलेच्या तरल
मनाची गरज तितक्याच तरलपणे
चितारण्याचा तो प्रामाणिक
प्रयत्न आहे आणि त्यावर चर्चा
होण्याची अधिक गरज आहे.
शुन्यातून
विश्व निर्माण करण्याच्या
नादात त्याच विश्वात गुरफटून
गेलेल्या नायकाला पत्नीच्या
काही भावनिक गरजाही असतात
याचे झालेले विस्मरण चितारताना
लेखकाने काॅर्पोरेट जगतात
पैशाच्या पाठी धावणाऱ्या
तसल्याच असंख्य नायकांचे
डोळे उघडण्याचाच प्रयत्न
केला आहे.
तो
प्रयत्न विवाहबाह्य संबंधांच्या
चर्चेत दुर्लक्षिला जात असेल
तर त्या पायरीवर ते लेखक आणि
दिग्दर्शक म्हणून चिन्मय
मांडलेकरांचेच अपयश म्हणावे
लागेल.
नाटकातील
नायक म्हणून त्यांनी केलेला
अभिनय आणि तरल मनाच्या बुद्धीवादी
नायिकेच्या भूमिकेला न्याय
देताना स्पृहा जोशींनी जिवंत
केलेेले पात्र मात्र बिनतोड
आहे.
तुझ्या
जागी मी असतो तर,
म्हणजेच
माझे विवाहबाह्य संबंध उघड
झाले असते तर तू काय केले असते,
या
नायकाच्या प्रश्नाला नाियकेने
दिलेले उत्तर हे उच्च मध्यमवर्गीय
बदलत्या मानसिकतेवर प्रकाश
टाकणारे आहे.
त्या
उत्तरातच नाटकाचा सार सामावलेला
आहे.
म्हणूनच
विवाहबाह्य संबंध नव्हे,
स्त्री-पुरूषांनी
एकमेकांकडे पाहाण्याचा
दृष्टीकोन हा खरं तर या नाटकाचा
विषय आहे.
एकमेकांना
समजून घेण्याचा संदेश देणारे
हे नाटक आहे.
पण
नाटकाची चर्चा विवाहबाह्य
संबंधाच्याच अनुशंगाने होताना
िदसते.
असो.
त्या
निमित्ताने का असेना,
मध्यम
आणि उच्च मध्यमवर्गाने हे
नाटक पाहिले पाहिजे हे महत्वाचे.