औरंगाबादजवळ असलेल्या सुंदरवाडी गावाजवळ गुरूवारी अर्थात, २७ आॅगस्टच्या रात्री एका नोकरदार तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. त्या निमित्ताने माहिती घेत असताना या आधीही तिथे असेच प्रकार घडले असल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्या संदर्भात रविवारच्या दिव्य मराठीच्या सिटी पूल आऊटमध्ये भाष्य लिहीले. ते असे..
औरंगाबादजवळच्या सुंदरवाडीला गुरुवारी रात्री आणि त्याआधीही झालेले अत्यंत घृणास्पद प्रकार घडायला नकोच होते; पण असल्या प्रकारांसाठी पोिलसांना दोष देण्यात आणि हे शहर महिलांसाठी असुरक्षित झाले अाहे असा डांगोरा पिटण्यात मुळीच अर्थ नाही. िनर्जन आणि अंधाऱ्या जागी पोिलसांनी पहारा करीत बसावे, अशी अपेक्षा कोणी कशी करू शकतो? अशा निर्जन जागी एकांत शोधत गेलेल्या जोडप्यांबाबत असे प्रकार घडणारे हे काही एकमेव शहर नाही. ही गुन्हेगारांची पाठराखण नाही आणि समर्थन तर मुळीच नाही; पण वस्तुस्थितीपासून आपल्याला दूरही जाता येणार नाही. अशा निर्जन आणि अंधाऱ्या िठकाणी आपल्याला धोका होऊ शकतो असा साधा विचारही या एकांताच्या पाठी लागलेल्या जोडप्यांच्या मनाला शिवू नये? समाजाला अंधारात ठेवण्यासाठी आपण स्वत:ला अंधाराच्या आणि पर्यायाने संकटाच्या हवाली करीत आहोत, याचे भानही त्यांना राहू नये? याच परिसरात मारहाण, लूट आणि विनयभंग होऊनही आधी अनेकांनी तक्रारी केल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. घडलेला अत्याचारही अंधारात ठेवण्याची ही धडपड ज्या अपराधी भावनेतून केली जाते तोच अपराध अशा कृत्यांना खतपाणी घालतो आहे. सुंदरवाडीतील ही निर्जन जागा अशा बाबतीतली शहराजवळची एकमेव जागा नसावी. शहरातील अन्य जागीही एकांत शोधायला जोडपी जात असतील आणि तिथेही असे अंधारातच ठेवलेले प्रकार घडलेही असतील. आपल्याला लागलेली ठेच कोणी सांगत नाही म्हणून मागचा पुन्हा ठेचाळतो आणि त्यानंतरचाही. गुरुवारी रात्री झालेला प्रकारही त्या जोडप्याने अंधारात ठेवला असता तर पुढेही कदाचित असे प्रकार घडत राहिले असते. त्यामुळे फिर्याद देण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्या पीडित जोडप्याला औरंगाबादकरांनी मनोमन धन्यवादच द्यायला हवेत. पोिलसांनी पहारा करावा, अशी अपेक्षा नसली तरी पोिलसांचे खबरे, गुप्तवार्ता देणारी यंत्रणा अलीकडे मोडकळीस निघाली असावी, अशी शंका असल्या प्रकारांमुळे येते. अन्यथा असे घृणास्पद गुन्हे बंद करण्यासाठी पोिलसांना फिर्याद येण्याची वाट पाहावी लागली नसती.
औरंगाबादजवळच्या सुंदरवाडीला गुरुवारी रात्री आणि त्याआधीही झालेले अत्यंत घृणास्पद प्रकार घडायला नकोच होते; पण असल्या प्रकारांसाठी पोिलसांना दोष देण्यात आणि हे शहर महिलांसाठी असुरक्षित झाले अाहे असा डांगोरा पिटण्यात मुळीच अर्थ नाही. िनर्जन आणि अंधाऱ्या जागी पोिलसांनी पहारा करीत बसावे, अशी अपेक्षा कोणी कशी करू शकतो? अशा निर्जन जागी एकांत शोधत गेलेल्या जोडप्यांबाबत असे प्रकार घडणारे हे काही एकमेव शहर नाही. ही गुन्हेगारांची पाठराखण नाही आणि समर्थन तर मुळीच नाही; पण वस्तुस्थितीपासून आपल्याला दूरही जाता येणार नाही. अशा निर्जन आणि अंधाऱ्या िठकाणी आपल्याला धोका होऊ शकतो असा साधा विचारही या एकांताच्या पाठी लागलेल्या जोडप्यांच्या मनाला शिवू नये? समाजाला अंधारात ठेवण्यासाठी आपण स्वत:ला अंधाराच्या आणि पर्यायाने संकटाच्या हवाली करीत आहोत, याचे भानही त्यांना राहू नये? याच परिसरात मारहाण, लूट आणि विनयभंग होऊनही आधी अनेकांनी तक्रारी केल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. घडलेला अत्याचारही अंधारात ठेवण्याची ही धडपड ज्या अपराधी भावनेतून केली जाते तोच अपराध अशा कृत्यांना खतपाणी घालतो आहे. सुंदरवाडीतील ही निर्जन जागा अशा बाबतीतली शहराजवळची एकमेव जागा नसावी. शहरातील अन्य जागीही एकांत शोधायला जोडपी जात असतील आणि तिथेही असे अंधारातच ठेवलेले प्रकार घडलेही असतील. आपल्याला लागलेली ठेच कोणी सांगत नाही म्हणून मागचा पुन्हा ठेचाळतो आणि त्यानंतरचाही. गुरुवारी रात्री झालेला प्रकारही त्या जोडप्याने अंधारात ठेवला असता तर पुढेही कदाचित असे प्रकार घडत राहिले असते. त्यामुळे फिर्याद देण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्या पीडित जोडप्याला औरंगाबादकरांनी मनोमन धन्यवादच द्यायला हवेत. पोिलसांनी पहारा करावा, अशी अपेक्षा नसली तरी पोिलसांचे खबरे, गुप्तवार्ता देणारी यंत्रणा अलीकडे मोडकळीस निघाली असावी, अशी शंका असल्या प्रकारांमुळे येते. अन्यथा असे घृणास्पद गुन्हे बंद करण्यासाठी पोिलसांना फिर्याद येण्याची वाट पाहावी लागली नसती.
No comments:
Post a Comment